
श्रावणात येते जेव्हा पावसाची पहिली सर ,
आठवते मला माझे सुंदर आणि आनंददायी घर ...!!
पावसाचा पहिला थेंब जेव्हा धरणीत सामावतो ,
मनाला प्रसन्न करेल असा सुवास हवेत दरवळतो ...!!
सूर्याची किरणे नभ छेदून चहू दिशांनी पसरतात ,
त्यानंतर रंगीबिरंगी सुमने अजूनच टवटवीत दिसतात ...!!
पक्ष्यांचा थवा कसा मदमस्त होऊन , स्वछंदपणे आकाशात बागडत असतो ,
मेघांना छेदून नभापलीकडे जाण्याचा तो प्रवास अत्यंत स्फूर्तीदायी वाटतो ...!!
खळखळणार्या त्या नदीचा स्वर कर्णास किती मृदू आणि सुरैल जाणवतो ,
अमृततुल्य पाण्याचा आस्वाद घेऊन , आयुष्याची तहान भाग्ल्याचा अनुभव प्राप्त होतो ...!!
पहिल्या पावसात ओलेचिंब भिजण्याच्या अनुभव फारच अतुल्य असतो ,
कारण निसर्गाच्या सानिध्यात मग स्वर्गात आल्या सारखा भास होतो ...!!
उंच उंच पर्वतांवर जेव्हा ढगांची भेट होते ,
त्यांच्याकडे पाहून मला माझ्या मित्रांची फार आठवण येते ...!!
कोणाला पाऊस हवाहवासा वाटतो , तर कोणाला पाऊस नकोनकोसा वाटतो ,
पण मी मात्र श्रावण ऋतूची वाट फार आतुरतेने पाहत असतो ...!!

